एसआयपी म्हणजे systematic Investment plan होय .एसआयपी म्हणजे दर महिन्याच्या ठरावीक दिवसाला ठरावीक रकमेची केली जाणारी गुंतवणूक होय . उदा . पोष्टाची पीपीएफ किंवा सरकारी नोकरांची जीपीएफ ही एसआयपी आहे . तेजी मंदीच्या बाजारात भांडवल सुरक्षीत ठेेवून नफा कमवण्यासाठी ही पध्दत चांगलीी आहे . तुम्हाला शेअर बाजारातील वेळ साधण्याची गरज नसतेेे . ठरावीक रक्कम , ठरावीक वेळेला अनेक वर्ष गुंतवल्यामूळे रुपयाची सरासरी होऊन चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. यामध्ये गणितामधील सरासरीच्या नियमाचा फायदा होतो . म्हणून या पद्धतीला रुपी कॉस्ट अॅव्हरेजींग असेही म्हणतात . चांगल्या म्यूच्यूअल फंडात वर्षाला २०- ३० % नफा मिळतो .जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांचे गुरू बेेंजामिन ग्राहम यांनी गुंतवणूूकीचे “मार्जिन ऑफ सेफ्टी ” सूत्र सांगितलेेे आहे . त्या सूत्राचा फायदा एसआयपीमूळे होतो. मुलामूलींचे शिक्षण, घर घेणे, मूलीचे लग्न, निवृत्तीवेेतन फंड यासाठी एसआयपी करणे उत्तम मार्ग आहेे . ज्यांना बाजारची दिशा समजत नाही, बीजनेेसमूळं वेळ नाही त्यांना ही पद्धत खूप चांगली आहेे . दिवस, आठवडा, महिना,पंधरा दिवस, सहा महिने या काळाची एसआयपी करता येतेे .
म्यूच्यूअल फंड आणि शेअर बाजारातील शेअर या दोन्ही ठिकाणी एसआयपी करता येते .
सेंसेक्स पडला म्हणून घाबरू नका आणि वर चढला म्हणून हर्षवायू होण्याची गरज नाही .पानगळ म्हणजे मृत्यू नसून नवपालवीची उंच गुडी असते . बाजार पडला तर खरेदी जास्त होते .बाजार चढला तर पैशाच्या कणसांची कापणी केली जाते . ECS system मुळे एसआयपी चा हप्ता बँकेच्या खात्यातून परस्पर कापून घेतला जातो . म्हणून गुंतवणूकमध्ये सातत्य राहते . शिस्त आहे . रिस्क कमी आहे . तेजी मंदीची काळजी करण्याची गरज नाही .
पीपीएफ किंवा जीपीएफ मध्ये ज्याप्रमाणे नियमीत बचत करून वर्षाला सरकारी नियमानुसार आठ टक्केपेक्षा जास्त चकवाढ व्याजाने फायदा मिळतो . तसाच म्यूच्यूअल फंड किंवा शेअरमधील एसआयपीमध्ये वर्षाला वीस तीस टक्के चक्रवाढ व्याजाने नफा मिळू शकतो . कमीत कमी पाचशे रुपये सुद्धा दरमहा गुंतवणूक करता येते . तेज मंदीच्या नैसर्गिक चक्रामूळे रुपयाची सरासरी होत राहते . आपल्या गुंतवणूकीची Reinvestment म्हणजे पूनरगुंतवणूक होऊन चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो . जर तुम्ही एक रुपया वार्षिक पंधरा टक्के चक्रवाढ व्याज दराने गुंतवला तर त्याचे पाच वर्षात दोन रुपये होतात . दहा वर्षात चार रुपये होतात .पंधरा वर्षांनंतर एक रुपयाचे आठ रुपये होतात . तीस वर्षात एक रुपयाचे पंधरा टक्के चकवाढ व्याज दराने फक्त चौसष्ट रुपये होतात . म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चक्रवाढ व्याजाच्या चमत्काराला जगातील आठवे आश्चर्य म्हटले आहे . एखादया पंचवीस वर्षाच्या तरुणाने दर महिन्याला फक्त १५५५ रुपयांची एसआयपी वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत करून फक्त बारा टक्केने गुंतवणूक केली तर त्याचे एक कोटी रुपये होतात . एखाद्या पंचवीस वर्षाच्या तरुणाने दर महिन्याला फक्त ६८१ रुपयांची एसआयपी वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत करून फक्त पंधरा टक्के चक्रवाढ व्याजाने गुंतवणूक केली तर त्याचे एक कोटी रुपये होतात . आज सामान्य माणूसही दर महिन्याला त्याच्या मोबाईलसाठी पाचशे रुपयांचा रिचार्ज सहज मारतो . मग दर महिन्याला फक्त एक हजार रुपयांची एसआयपी करून कोट्याधीश व्हायला काय हरकत आहे ?चहापाणी, तंबाकूवर महिन्याला अनेकांचे हजार रुपये . सहज खर्च होतात . मग बचत करायलाच काय अडचण आहे ?
प्रत्येक आर्थिक उध्दीष्ट साध्य करण्याचा राजमार्ग म्हणजे एसआयपी होय . घर घेणे, गाडी घेणे, मूलांचे शिक्षण आणि लग्न, निवृत्तीनंतर वेतन मिळण्यासाठी एसआयपी उत्तम पध्दत आहे . मासिक तीन हजार रुपयांची एसआयपी दहा वर्ष करून सरासरी १५ % परतावा मिळाला तर तुम्हाला आठ लाख चाळीस हजार मिळतात . यात चारचाकी गाडी सहज घेता येऊ शकेल . मासिक तीन हजार रुपयांची एसआयपी सव्वीस वर्ष करुन गुंतवणूकीवर सरासरी पंधरा टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला एक कोटी पंधरा लाख मिळतात .एवढया पैशात तुमच्या स्वप्नातील घर सहज घेता येईल
आपण जास्त डोकं लावायचं काम नाही . फक्त गुंतवणूकीमध्ये सातत्य ठेवा . एकाच वेळी गुंतवणुक करण्यापेक्षा दर महिन्याला करा . त्यामुळे Rupee Cost Averaging होईल . ज्यांना शेअर बाजारातील चढउतार कळत नाही . पण त्याचा नफा मात्र घ्यायचा आहे .त्यांना एसआयपी चांगली आहे .एकाच वेळी खूप जास्त फंडात गुंतवणूक करणे टाळावे . दोन तीन निवडक फंडात विभागून गुंतवणूक करा . दीर्घकालावधी गुंतवणूकीतून मोठी रक्कम मिळवण्यासाठी डिव्हीडंड या पर्यायाऐवजी ग्रोथ ऑप्शन निवडा . वेळेला तुमच्यासाठी काम करू द्या . तुम्ही सावकाश आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचे ध्येय ठेवा . RT KaDum Strategy : Wealth Creation अर्थात संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमीत गुंतवणूक करा . जितका तुमचा गुंतवणूक कालावधी जास्त असतो, तेवढाच धोका कमी आणि मिळणारा परतावा जास्त असतो .
मूठभर धान्य पेरल्यावर पोतं भरून उगवते . पोते भरून पेरल्यावर मोठे गोडाऊन भरून माल निघतो . सतत गुंतवणूक करा . कमी गुंतवणूकमधून जास्त फायदा घ्या. भांडवल सुरक्षित राहते . प्रत्येक महिन्याला गुंतवणूक रक्कम निश्चित .आपली मिळकत वर्षानुवर्ष वाढत जाते . म्हणून चार वर्षानंतर हजार रुपयांची गुंतवणूक किरकोळ वाटते .केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य रोज बघणे टाळावे . कोणत्याही फंडात गुंतवणूक करताना त्याच्या मागील चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घ्या .एनएफओ मध्ये कधीच गुंतवणूक करू नका . सुरक्षित गुंतवणूक शोधण्यात वेळ फूकट घालवू नका .एफडी किंवा एनएससी सुरक्षित आहे परंतु त्यांचा परतावा महागाई दरापेक्षा जास्त नाही . मग अशा सुरक्षीत बचतीला गुंतवणूक का म्हणावे ? चला तर मग लवकरात लवकर गुंतवणूूकीला सुरूवात करा . ………रवीन्द्र टी कदम
SIP
हा लेख आवडला असेल तर माझ्या नावासहीत शेअर करा . मित्रांबरोबर चर्चा करा . इतर पुस्तके वाचा .सरकारी गुंतवणूक तज्ञाचा आवश्य सल्ला घ्या . मला प्रतिक्रिया जरुर कळवा . खाली शंका विचारा . अभ्यास करून उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करीन . धन्यवाद ! ! !
Tags : ,
At Post Akola (Wasud) Imali
Garden, Near ShindeWasti Primary
School, Tal: Sangola Dist: Solapur
Pin 413307
+91 9689925876
Privacy policy & Disclaimer
Arthsamruddhi Investing Hub © 2024| Designed & Developed By : www.anchoredge.in